ताज्याघडामोडी

कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन नियोजन करावे – प्रांताधिकारी गजानन गुरव

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वारकरी व नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने कार्तिकी यात्रेबाबत शासनाकडून निर्णय घेण्यात येईल. तथापि कार्तिक यात्रा भरविण्याबाबत शासनाकडून सूचना प्राप्त झाल्यास प्रशासनाने पुर्व तयारी म्हणून आवश्यक नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी  सर्व विभागने समन्वय राखून नियोजन करावे अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.                कार्तिक वारी पुर्व नियोजनाबाबत नवीन भक्त निवास  पंढरपूर येथे […]

ताज्याघडामोडी

पाच वर्षांत मिळणार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला 700 वर्षांपूर्वीचे स्वरूप

ज्ञानोबा तुकाराम आदी संतांच्या काळातील म्हणजे 700 वर्षांपूर्वीचं विठ्ठल मंदिर कसं असेल? याची सगळ्यांनाच उत्कंठा लागून राहिली आहे. अशातच आता पुरातत्व विभागानं दिलेल्या विकास आराखड्याला मंदिर समितीनं मंजुरी देत तो आराखडा राज्य शासनाकडे पाठवला आहे. येत्या 5 वर्षांत हे काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे. विठुरायाच्या बाबतीत नाही, घडविला नाही बैसविला ही मान्यता वारकरी संप्रदायाची आहे. […]

ताज्याघडामोडी

पायी वारीवरुन गोपिचंद पडळकर आक्रमक; सरकारने विरोध केला तरी वारी होणार

पंढरपूर : एकीकडे राज्यावर कोरोनाचे संकट ओढावलेले असतानाच दुसरीकडे वारकरी संप्रदायाचा आग्रह असूनही यंदा पायी वारी नाही अशी ठाम भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. असे असताना आता मोजक्या वारकऱ्यांसह 3 जुलै रोजी आळंदी येथून पायी वारीला सुरुवात होणार असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणही यात एक दिवस सहभागी होणार असल्याचे वक्तव्य […]

ताज्याघडामोडी

आषाढी वारीच्या निर्णयासंदर्भात सरकारने पुनर्विचार करावा, देहू संस्थानच्या विश्वस्तांची मागणी

मुंबई : राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत, त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या पालख्यांना बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांना 20 बसेस देण्यात येणार आहेत. तसा निर्णयच कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी पालख्यांना परवानगी देण्याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली […]

ताज्याघडामोडी

मानाच्या १० पालख्यांना बसमधून वारीची परवानगी, देहू-आळंदीसाठी १०० वारकऱ्यांना परवानगी – अजित पवार

आषाढी वारी पालखीसाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या बैठकीत बरीच चर्चा झाली. आषाढी वारीसाठी आग्रही मागणी होती. यानंतर काल मंत्रिमंडळ बैठकीत सर्वमानाच्या १० पालखी सोहळ्यांना परवानगी द्यायचा निर्णय झाला आहे. परवानगीमध्ये साधाराण मागील वर्षी कोरोनाच्या संकटात वारकरी संप्रदायासह सर्व मान्यवरांना आवाहन केले होते. यावर्षी मानाच्या १० पालखी सोहळ्यांना आषाढी वारीच्या प्रस्थान करण्यासाठी परवानगी […]