Uncategorized

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचे टेंडरही निघाले 

दुसऱ्या टप्प्यात पंपगृह,संरक्षक भिंत,बॅलन्सिंग टॅंक,उर्ध्वगामी नलिका आदी कामांचा समावेश  

आ.आवताडे यांच्याकडून मुबंईत दोन दिवस ठाण मांडून पाठपुरावा 

 

गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाचा मुद्दा ठरलेली मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला आमदार समाधान आवताडे यांनी पाठपुरावा करून १३ मार्च २४ च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळवली होती त्यानंतर पहिल्या टप्प्यातील १११ कोटीचे टेंडर निघून सात ऑक्टोबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामाचा कार्यारंभ करण्यात आला आहे यावरही निवडणुकीच्या तोंडावर हे स्टंटबाजी सुरू असल्याचे काही विरोधकांकडून म्हटले जात असताना कार्यक्रमानंतर आमदार  समाधान आवताडे यांनी दोन दिवस मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठाण मांडून दुसऱ्या टप्प्याचे टेंडर ही काढले आहे.या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे ७८ कोटी ४३ लाखाचे टेंडर काल दि १० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाले असून निविदा मागवण्यात आल्या आहेत त्यामुळे दिवसेंदिवस या योजनेवर बोलणाऱ्या विरोधकांची बोलती बंद होत चालली आहे.पहिल्या टप्प्याच्या टेंडर नंतर आमदार समाधान आवताडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या योजनेच्या शुभारंभासाठी मंगळवेढ्यात बोलवत धुमधडाक्यात या योजनेचा शुभारंभ करून कामास सुरुवात केली आहे.पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होते न होते तोच दुसऱ्या टप्प्यातील कामाचेही टेंडर निघाले असून ही योजना युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचा चंग आमदार समाधान आवताडे यांनी बांधला असल्याचे यावरून दिसून येत आहे.

    ६९७.५१ कोटीच्या  मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या या कामांमध्ये दुसऱ्या टप्प्यात पंपगृह टप्पा दोन,संरक्षक भिंत, बॅलन्सिंग टॅंक, उर्ध्वगामी नलिका दोन लेंडवे चिंचाळे, मुख्य गुरुत्वीय नलिका व त्यावरील वितरण व्यवस्थेचे काम, तसेच योजना कार्यान्वितीकरण करणे, पाच वर्षे परिचलन,देखभाल व दुरुस्ती करून शेतकऱ्यांना प्रशिक्षणासह सर्व वितरण व्यवस्थेचे पाणी वापर संस्था स्थापन करून सर्व वितरण व्यवस्था हस्तांतरण करणे या बाबी दुसऱ्या टप्प्यातील टेंडर मध्ये नमूद करण्यात आले आहेत.मंगळवेढा तालुक्यातील जनतेला ही योजना वर्षानुवर्षे राजकारणाचा मुद्दा ठरल्याने मृगजळ वाटत होती मात्र आमदार समाधान आवताडे यांनी पाठपुरावा करत या योजनेचे काम सुरू केल्याने येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतात मंगळा उपसा सिंचन योजनेचे पाणी येईल अशी आशा वाटू लागली आहे.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांने पहिल्या टप्प्यातील कार्यारंभ व दुसऱ्या टप्प्याची निघालेली निविदा हे या दुष्काळी भागासाठी फार मोठा दिलासा देणाऱ्या घटना आहेत या योजनेच्या लाभक्षेत्रातील सर्व क्षेत्राला शंभर टक्के ठिबक सिंचन,प्रत्येक शेतकऱ्याला सोलर पंप व शेततळे शासनाने विशेष योजना राबवून देण्यासंदर्भात पायलट प्रोजेक्ट राबविण्याची मागणी आम्ही करणार आहे अंकुश पडवळे कृषीभूषण शेतकरी खुपसंगी यांनी व्यक्त केली आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *