दोन ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्माजी गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीनिमित्त कैलासवासी स्वतंत्र सैनिक पुरुषोत्तम बाबुराव आडवळकर यांच्या निवासस्थानी वरील थोर पुरुषांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी स्वातंत्र्य सेनानी आढवळकर यांचे चिरंजीव श्री मिलिंद आडवळकर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्माजी गांधी व त्याचप्रमाणे स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी पा. तू. उत्पात यांचे चिरंजीव श्री सुनील उत्पात यांचे शुभ हस्ते प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले व वरील थोर नेत्यांच्या सन्मानार्थ भजन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नागनाथ आदरराव व जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुहास भाळवणकर अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अशपाक भाई सय्यद युवराज फरकंडे काँग्रेस नेते देवानंद इरकल रशीद मनेरी सतीश रोकडे शकील मुल्ला संतोष ताटे इत्यादी काँग्रेस प्रेमी उपस्थित होते.
Related Articles
सरन्यायाधीशांनी कोश्यारींना झोडलं, प्रश्नांची सरबत्ती, उद्धव ठाकरेंना आनंद, म्हणाले,आता….
सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष प्रकरणात आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर कडक शब्दात ताशेरे ओढले. पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना बहुमत चाचणीसाठी अधिवेशन बोलावणं म्हणजे सरकार पाडण्यात वाटा उचलणं किंबहुना पक्ष फोडण्यात मदत करणं. राज्यपालांनी अशा कृतीपासून दूर राहावं किंबहुना राज्यपालांनी आपल्या मर्यादेत राहावं, अशा शब्दात सरन्यायाधीशांनी तत्कालिन राज्यपालांना […]
विश्वास नांगरे पाटील यांच्या सासऱ्यांच्या विरोधात ईडीची कारवाई
राज्यात ईडीच्यावतीने पुन्हा कारवाईचा धडाका सुरु करण्यात आलेला आहे. दरम्यान ईडीच्यावतीने आज ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले. दरम्यान औरंगाबाद येथे टाकण्यात आलेल्या छाप्यात औरंगाबादचे बडे व्यावसायिक पद्माकर मुळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे प्रकरणाचा तपास करणारे मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे पद्माकर मुळे हे सासरे आहेत. ईडीच्यावतीने आज […]
केंद्र सरकारचा आक्षेप, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीचा आदेश राज्य सरकार मागे घेणार
केंद्र सरकारच्या पत्रानंतर मंगळवारी रात्री उशिरा काढलेला आदेश राज्य सरकारने मागे घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी लागू असणारा आदेश मागे राज्य सरकार मागे घेण्याची शक्यता आहे. या आदेशानुसार महाराष्ट्रात इतर राज्यातून एअरपोर्टवर येणाऱ्या सर्व प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. कोव्हिडं चाचणी निगेटीव्ह असतानाही 14 दिवस होम कोरंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई […]