ताज्याघडामोडी

मोठी बातमी! बारावीच्या परीक्षा रद्द, मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाला दोन दिवसात निर्णय घेऊ असं म्हटलं होत. त्याप्रमाणं बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. देशातील वाढत्या करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता केंद्रानं हा निर्णय घेतला आहे.