राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज स्व.भारत भालके यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी सरकोली ता.पंढरपूर येथे आले असता त्यांनी भालके परिवाराची भेट घेऊन त्यांना धीर दिला.खा.शरद पवार यांच्या या भेटीमुळे पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील स्व.आ.भारत भालके समर्थकांना मोठा दिलासा मिळाला असून स्व.आ.भारतनाना ज्या पवार साहेबांना आपले दैवत मानत होते साक्षात तेच शरद पवार त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटूंबास धीर आणि आधार देण्यास आल्यामुळे या भारतनाना प्रेमींमध्ये मोठा उत्साह संचारला होता.यावेळी जनसमुदाया समोर बोलताना विठ्ठल परिवाराचे नेते म्हणून कल्याणराव काळे यांनी स्व.भारतनानांच्या आठवणी जागवताना आर्थिक संकटात सापडलेल्या या तालुक्यातील तिन्ही साखर कारखान्यांना सरकारचे बळ मिळावे यासाठी केलेल्या पाठपुराव्याची आठवण जागवतानाच खा. शरद पवार यांनी केलेल्या मार्गदर्शन आणि सहकार्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला व यापुढे शरद पवार सांगतील त्या पद्दतीने काम करू असे सांगितले.त्यांच्या या विधानामुळे कल्याणराव काळे हे लवकरच भाजपा सोडून राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश करतील अशी चर्चा पंढरपूर तालुक्यात सुरु झाली आहे.
Related Articles
महाराष्ट्रातील एका व्यापाऱ्याची हत्या
जळगाव, 17 जानेवारी : जळगावमधील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील मूळ रहिवासी असलेले व अफ्रिकेतील जार्डिन मेबल या कंपनीचे मालक उद्योजक सर्वेश श्रीकांत मणियार यांचा खून करण्यात आला आहे. घरी परतत असताना तंजोम्बातो येथे 10 ते 12 सशस्त्र व्यक्तींनी प्राणघातक हल्ला करून खून केला.सहकाऱ्याने स्वत: ला मणियार यांच्या अंगावर झोकून देत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, […]
रिक्षाचालकांना आर्थिक मदत,जिल्ह्यातील 12 हजार 800 परवानाधारकांपैकी 6 हजार 199 अर्ज दाखल
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ॲटोरिक्षा परवानाधारकांना 1 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. हे अनुदान ॲटोरिक्षा परवानाधारकांच्याच बँक खात्यात ऑनलाईन जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ॲटोरिक्षा परवानाधारकांनी https://transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवरून आपली माहिती कोणतीही कागदपत्रे न जोडता भरावी. जिल्ह्यात 12 हजार 800 ॲटोरिक्षा परवानाधारकांपैकी 3 जूनपर्यंत 6 हजार 199 अर्ज प्राप्त […]
टाकळी रोड जगदंबा नगर येथे घरफोडी
पंढरपूर शहरालगत असलेल्या लक्ष्मी टाकळी हद्दीतील जगदंबा नगर येथे घरमालक कुटूंबासह परगावी गेल्याची संधी साधत चोरटयांनी दरवाजाचे कडीकोयंडा कुलूप उचकटून सोन्याचांदीचे दागिने,चांदीच्या मूर्ती तसेच रोख रक्कम ५० हजार लंपास केली असून या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.या बाबत सोमनाथ देठे रा.लक्ष्मी टाकळी यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली […]