राजस्थान ते विदर्भ या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील सर्वच भागांत तीन दिवस पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील किमान तापमानात दीड ते दोन अंशांनी वाढ झाल्याने थंडीत घट झाली आहे. राज्यात 28 ते 30 डिसेंबर या काळात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. याची तीन कारणे आहेत. दक्षिण-पश्चिम राजस्थान […]
ताज्याघडामोडी
एसटी कर्मचारी संपाचं करायचं काय?; शेवटी सरकार उचलणार ‘हे’ पाऊल
अनेक प्रकारे कारवाया करून देखील एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्याने सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे. एककीडे एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न असून दुसरीकडे सर्वसामान्य जनताही भरडली जात आहे. हे लक्षात घेत आणि पुन्हा एकदा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू करण्यात आली असून ही कारवाई आता अधिक […]
रेल्वे गेट क्रमांक २४ मंगळवार दिनांक २८ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार
दुरुस्तीच्या कामासाठी पंढरपूर-सांगोला रेल्वे मार्गावरील गेट क्रमांक २४ कि.मी.431 7/8 हे रेल्वे गेट मंगळवार दिनांक २८ डिसेंबर रोजी पहाटे ६ वाजले पासून ते शनिवार दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी रात्री १२ वाजेपर्यत दुरुस्तीच्या कामामुळे रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहे. तरी या ५ दिवसाच्या कालावधीत कोर्टी -टाकळी बायपास रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतुकीसाठी […]
पाण्याच्या ड्रममध्ये सापडला बाळाचा मृतदेह; जन्मदात्या आईला अटक
ठाण्यातील कळवा परिसरात शनिवारी बेपत्ता झालेल्या पाच महिन्यांच्या बाळाचा मृतदेह एका पाण्याच्या ड्रममध्ये आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून काही संशयितांना ताब्यात घेतले होते. मात्र, पोलीस तपासात वेगळीच आणि धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कळवा परिसरात सायबानगरमध्ये राहणारे पाच महिन्यांचे बाळ अचानक बेपत्ता झाले होते. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल […]
तोतया NCB अधिकाऱ्याच्या कारवाईला घाबरून अभिनेत्रीची आत्महत्या
सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि त्यानंतर कार्डिलिया क्रूजवरील ड्रग्ज पार्टीवर NCB ने कारवाई केली होती. यानंतर NCB ची दहशत ड्रग्ज पार्टीमध्ये सहभागी होणाऱ्या बॉलीवूड कलाकारांमध्ये पहायला मिळाली. मात्र हीच संधी साधून काही भामटे NCB अधिकारी असल्याचं सांगत कारवाईच्या नावाखाली खंडणी उकळत असल्याचे समोर आले आहे. याच टोळीच्या त्रासाला कंटाळून जोगेश्वरीत एका २८ वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीने […]
राज्यात लॉकडाऊन केव्हा लागणार? आरोग्य मंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती
मुंबईसह राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा धोका वाढतोय. कोरोना, ओमायक्रॉन आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवीन नियमावली जाहीर केली. त्यानुसार निर्बंध लावण्यात आले आहे. तसेच रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांमुळे राज्यात लॉकडाऊन लागणार का,अशी भिती सर्वसामांन्यामध्ये आहे. या लॉकडाऊन करण्याच्या मुद्द्यावरुन आणि इतर मुद्द्यांवरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे […]
शेतकऱ्याचा क्लेम नाकारणाऱ्या विमा कंपनीला दणका
शेतकऱ्याचा क्लेम नाकारणाऱ्या विमा कंपनीला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे. कंपनीने तक्रारदार यांना शेतकरी अपघात नुकसानभरपाई रक्कम 2 लाख रुपये वार्षिक 7 टक्के व्याजाने देण्याचा आदेश आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही.देखमुख, सदस्या शुभांगी दुनाखे, अनिल जवळेकर यांनी दिला आहे. दरम्यान, नुकसानभरपाई म्हणून 25 हजार रुपये, तर तक्रारीच्या खर्चापोटी 5 हजार रुपये देण्यात […]
माजी आमदाराच्या ड्रायव्हरला लुटलं; डोळ्यात मिरची पूड टाकून लाखो रुपये लंपास
माजी आमदाराच्या ड्रायव्हरकडून लाखो रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. पानिपत शहराच्या माजी आमदार रोहिता रेवडी यांच्या गाडीचा माजी ड्रायव्हरला चोरट्यांनी लुटलं आहे. ड्रायव्हर करण याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याच्याकडील 1 लाखांहून अधिकची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. पीडित करण याने सांगितले की, तो छजपूर येथील निवासी आहे. रात्री जवळपास 10 […]
राज्यात आजपासून नवे निर्बंध लागू, रात्री जमावबंदीची घोषणा
सरत्या वर्षाबरोबर कोरोनालाही निरोप देण्याची चिन्हं दिसत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा तयार होतोय. त्यामुळे मागच्या काही महिन्यांपासून सैल झालेले निर्बंधाचे दोर पुन्हा घट्ट होत आहेत. राज्य सरकारनेही खबरदारी म्हणून पुन्हा काही नवे निर्बंध लावले आहे. राज्यात काय निर्बंध असतील? 1. रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत महाराष्ट्रात जमावबंदी असेल. 2. लग्नसोहळ्यासाठी बंदिस्त हॉलमध्ये 25 […]
LPG Cylinder मुळे अपघात झाल्यास मिळेल 50 लाखांची नुकसान भरपाई
LPG गॅस सिलेंडर वापरताना काळजीपूर्वक वापरावा, अशा सुचना वारंवार दिल्या जातात. कारण, सिलेंडरमधील छोटासा बिघाड देखील मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकतो. एलपीजी वापरताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास काय केले पाहिजे, हे जाणून तर घेणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याला हे देखील माहिती पाहिजे की, जर एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाला किंवा गॅस […]











