Uncategorized

सावरकर चौकातील रोजच्या वाहतुक कोंडीला नागरिक वैतागले

पंढरपूर शहरातील सर्वात जास्त वर्दळीचा चौक समजल्या जाणार्या सावरकर चौकात सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असून त्यामुळे या परिसरातून ये-जा करणार्या अबालवृध्दांना व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.शहराचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने व नविन व जुन्या बसस्थानकाकडे जाणार्या प्रवाशांची संख्या मोठी असून राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी.बसेस याच मार्गाने ये-जा करीत असतात.येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतुक शाखेने या चौकात सिग्नल यंत्रणा बसविली असली तरी हे सिग्नल बंद असल्याचे दिसून येते.त्याच बरोबर खोमणे गुळाचा चहा दुकानापासून ते रंगोली हॉटेल पर्यंतचा परिसर हा नो पार्कींंग झोन असला तरी चारचाकी वाहने ऐन गर्दीच्या वेळी खुशाल उभी केली जात असून याचा वाहनचालकांना व पादचार्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्या काही महिन्यापासून शहर वाहतुक शाखेकडून शहरात दुचाकी चालकांवर मोठया प्रमाणात दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे दिसून येते मात्र केवळ दंड वसुली हेच वाहतूक शाखेचे काम नसून शहरातील किमान नो पार्कींगचे फलक लावलेल्या ठिकाणी तरी अस्ताव्यस्त वाहने पार्कींग केले जाणार नाहीत याची दक्षता वाहतुक शाखेने घेतली पाहीजे अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

शहरातील काही प्रमुख चौकातील वाहतुकीची कोंडी हा सातत्याने टिकेचा विषय झाला असून सावरकर चौक हा त्यापैकी एक आहे.निदान सकाळी व सायंकाळच्या गर्दीच्या वेळी तरी या ठिकाणी नो पार्किग झोनची कठोर अमलबजावणी केली जावी अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसून येत आहे.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *