अखिल भारतीय छावा संघटना पंढरपूर कडून ई -पास ची होळी करून राज्य सरकार चा निषेध
महाराष्ट्र राज्य सरकारने एसटी महामंडळाची बस विना पास राज्यभरातून प्रवास करण्यासाठी सुरू केली व खाजगी वाहनधारकांवर ई पास ची सक्ती आणून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आनली एकीकडे प्रशासन कोरोणा पासून वाचण्याचे संदेश देत आहे अनेक उपाययोजना करत आहे आणि एकीकडे अनोळख्या व्यक्तिबरोबर व लक्षणे माहीत नसलेल्या व्यक्ति बरोबर प्रवास करण्यास परवानगी देत आहे लॉकडाऊन मुळे चार महिने घरातच राहणाऱ्या सदस्यांबरोबर प्रवास करण्यास बंधने घालत आहे,आणि एकीकडे सरकार आपला महसूल (तिजोरी) भरण्यासाठी जनतेचा जीव धोक्यात घालत आहे आणि एकीकडे गोरगरिबांना करून खाण्यासाठी बंधने आणून त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणत आहे.
बँक व फायनान्स वाले आज गाडी चा व्यवसाय करून खाण्यावर तगादा लावून त्यांच्या गाड्या ओढून नेत आहेत अश्या गोर गरीब वाहनधारकांनी जगावे की मरावे हा प्रश्न सर्वांसोमर असताना या राज्य सरकारने याचे उत्तर द्यावे आज अखिल भारतीय छावा संघटनेकडून या सरकारचा ई पास जाळून निषेध करण्यात आला जर यापुढे खाजगी वाहनांवरील ई पास त्वरित बंद न झाल्यास या ही पेक्षा रस्त्यावर उतरून तीव्र असे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला यावेळी खाजगी वाहन धारक चालक मालक व अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.