पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे हद्दीतून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांकडून सातत्याने कारवाई होत असली तरी येथून होणारी अवैध वाळू चोरी हा पोलीस प्रशासनास डोकेदुखी ठरला आहे असेच म्हणावे लागेल.काल शनिवार दिनांक 18/09/2021 रोजी रात्री ९ चे सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना भटुंबरे येथून अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पो.ना. तडवी,पो.कॉ.सुर्वे,पो.कॉ. हुलजंती हे सदर ठिकाणी दाखल झाले असता भटुंबरे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोरील रोडवर एक पांढ-या रंगाची पिकअप वाळू वाहतूक करताना आढळून आला.यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी अशोक लेलंड कंपनीचा पिकअप वाळूसह ताब्यात घेत चालक समाधान भिमा गायकवाड वय 25 वर्ष रा भटुंबरे ता पंढरपुर विरूद्ध भा.दं.वि. कलम 379,सह गौण खनिज कायदा1978चे कलम4(1),4(क)(1)व21 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
Related Articles
गाळप परवान्याबाबत सहकार शिरोमणी कारखान्याचा खुलासा
चेअरमन कल्याणराव काळे यांनी दिली माहिती भाळवणी :- मागील दोन-तीन दिवसापासून दै.वर्तमानपत्रामध्ये कारखान्याने गोपिनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याणकारी महामंडळ योजना निधी न भरल्याने गाळप परवाना मिळाला नाही. याबाबत कारखान्याचे वतीने खुलासा करीत आहोत. आमचे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि, चंद्रभागानगर, भाळवणी, ता.पंढरपूर, जि.सोलापूर या संस्थेने महाराष्ट्र शासनाने दि.28 जुलै 2022 रोजी […]
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याच्या नियुक्तीवरून उद्धव ठाकरे नाराज
जलसंपदा विभागाच्या सचिवांच्या नियुक्तीवरून मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडे म्हणजेच शरद पवार यांच्याकडे स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे खात्रिलायकरित्या समजते. ‘जलसंपदा विभागाच्या कामात घाईगडबडीत निर्णय घ्यायला लावू नका,’ असे मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शरद पवारांकडे व्यक्त केल्याचे समजते. तर, मुख्यमंत्र्यांच्या एकूणच कारभाराविषयी राष्ट्रवादीकडूनही नाराजी व्यक्त केली जात असून,प्रशासनाला हाताशी धरून मुख्यमंत्री […]
वडिलांनी लेकीला, तिच्या प्रियकराला संपवलं; मृतदेह मगरींनी भरलेल्या नदीत फेकले
मध्य प्रदेशच्या मुरेना जिल्ह्यातील अंबाहमध्ये वडिलांनी लेकीचा आणि तिच्या प्रियकराचा खून केला. हे प्रकरण ऑनर किलिंगचं असल्याची माहिती तपासातून उघडकीस आली आहे. मुलीच्या वडिलांनी दोघांची हत्या करुन त्यांचे मृतदेह चंबळ नदीत फेकले. या नदीमध्ये मगरींची संख्या अधिक आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस चंबल नदीच्या रेह घाटावर पोहोचले. स्थानिक पाणबुडे आणि एसडीआरएफच्या पथकांकडून चंबळ नदीपात्रात मृतदेहांचा […]