Uncategorized

प्रचंड आग्रह तरीही जनसंवाद सभेत आ.संजयमामाचा भाषणास नकार

पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे स्व. भारत भालके यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा तालुक्यात काढण्यात येणाऱ्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ काल मंगळवेढा येथून करण्यात आला.यावेळी आयोजित राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्ह्यातील अनेक जेष्ठ नेते उपस्थित होते.या वेळी उपस्थित जनसमुदायासमोर या नेत्यांनी स्व.आ.भारत भालके यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचे अपुरे काम पुढे नेण्यासाठी भगिरथ भालके यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष ठाम राहील अशी ग्वाही देत लवकरच होणाऱ्या पोटनिवडणुकीत भगिरथ भालके हेच राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार असतील हे ठामपणे सांगितले.मात्र यावेळी आ.संजयमामा शिंदे यांचे नाव भाषणासाठी पुकारण्यात आल्यानंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त करण्यास नकार दिला.यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लतीफ तांबोळी यांच्यासह मंचावरील इतरांनीही आ.शिंदेंना भाषणासाठी प्रचंड आग्रह केला,अक्षरश हाताला धरून उभा केले मात्र आ. संजयमामा शिंदे हे कुठल्याही परिस्थितीत भाषण करण्यास राजी नसल्याचे दिसून आले.हा प्रकार मंचावर बराच वेळ सुरु होता,निदान आ.शिंदेनी जयंती निमित्त अभिवादनपर चार शब्द तरी बोलावेत असा आग्रह उपस्थित जनसमुदायातूनही करण्यात येऊ लागला तरीही आ.संजयमामा शिंदे हे ठाम राहिल्याचे दिसून आले.         

        मात्र या साऱ्या घड्मामोडी नंतर उपस्थित जनसमुद्यात मात्र वेगळीच चर्चा होताना दिसून आली.२०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आ. संजयमामा शिंदे यांनी भाजपशी दोस्ताना करत जिल्ह्यात महाआघाडीच्या प्रयोग करून जिल्हा परिषदेवरील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला प्रथमच सुरुंग लावला होता.यावेळी त्यांना पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील भालके विरोधक गटाचे आ.प्रशांत परिचारक आणि दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांची मोलाची साथ लाभली होती.आणि जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला शह देण्यात यशस्वी ठरलेल्यांचा ”दोस्त ग्रुप” हि चर्चेत आला.पुढे लोकसभा निवडणुकीवेळी आ. संजय शिंदे हे राष्ट्रवादीत गेले.आ.संजय शिंदे आणि अकलूज यांचे राजकीय हाडवैर सर्वश्रुत असल्यानेच व मा.खा.विजयसिह मोहिते पाटील सर्मथकांनी भाजपात प्रवेश केल्यानेच संजय शिंदे हे भाजपापासून दुरावले अशीही चर्चा झाली होती.२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत करमाळा विधानसभा मतदार संघातून शिंदे हे राष्ट्रवादी कॉग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदार म्हणून विजयी झाले खरे पण सरकार स्थापन करण्याच्या घडामोडीत त्यांनी थेट देवेंद्र फडणीवस यांची भेट घेऊन आपला पाठींबा जाहीर केला होता.आणि आ.संजयमामा शिंदे यांच्या या बदलत्या भूमिकेबद्दल जिल्ह्यात राष्ट्रवादीत प्रचंड नाराजी पसरली होती.पण महाविकास आघडीची मोट बांधली गेली आणि आ.शिंदे हे ”गुपचूप” राष्ट्रवादीच्या गोटात परतले.   

      काल स्व.भारतनानांच्या जयंतीदिवशी आयोजित कार्यक्रमात बोलण्याचा प्रचंड आग्रह करूनही आ.संजयमामा शिंदे यांनी बोलण्यास नक्की कशामुळे नकार दिला या बाबत त्यांना बोलण्यासाठी वारंवार हाताला धरून उठविण्याचा प्रयन्त करणारे राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लतीफ तांबोळी यांच्याकडे विचारणा केली असता विधानपरिषदेच्या पद्वीधदार व शिक्षक मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मी आणि आ.संजयमामा हे दोघेही जिल्ह्यात फिरत असताना त्यावेळीही त्यांनी ११ ठिकाणी सभा आ.संजयमामा बोलले नाहीत तसेच ते याठिकाणीही बोलले नाहीत त्याच बरोबर या कार्यक्रमाची वेळ ४ वाजताची होती,मात्र कार्यक्रम ७ वाजता सुरु झाला.खूप मोठा जनसमुदाय बराच वेळ थांबून होता व अनेक मान्यवरांची भाषणे बाकी होती त्यामुळेच त्यांनी भाषण टाळले अशीच प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *