पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील कल्याणी सीमा चौकी परिसरात एका तलावातून सुमारे 2.57 कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे बीएसएफने जप्त केली आहेत. विशिष्ट माहितीच्या आधारे सोन्याचा शोध घेण्यासाठी बीएसएफच्या पथकाने सोमवारी एका तलावात शोध मोहीम हाती घेतली, त्यावेळी त्यांच्या हाती हे घबाड हाती लागले.
तळ्यात 40 सोन्याची बिस्किटे सापडली आहेत. जप्त केलेल्या सोन्याची बाजारातील किंमत सुमारे 2.57 कोटी रुपये आहे, काही महिन्यांपूर्वी पाठलाग केल्यावर एका तस्कराने तलावात उडी मारून सोने लपवले होते, असे बीएसएफत्या निवेदनात म्हटले आहे.
त्यावेळी आम्ही त्याला पकडले असता, त्याच्या ताब्यातून काहीही सापडले नाही. म्हणून आम्ही त्याला सोडून दिले. त्याने तलावात सोने लपवले होते आणि ते परत मिळवण्याची संधी शोधत होता,’ असे या निवेदनात म्हटले आहे.