रेल्वे पुलावरून मारली उडी
भाईंदर आणि नायगाव रेल्वे स्थानका दरम्यान असलेल्या रेल्वे पुलावरून एका १६ वर्षीय मुलीने खाडीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने या मुलीचे प्राण वाचविण्यात यश आले असून या संपूर्ण घटनेचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या मुलीने रेल्वे पुलावरून खाडीत उडी घेतली. त्यानंतर तेथे असलेल्या मच्छिमारांनी मोठ्या जिगरीने खाडीत बुडणाऱ्या मुलीपर्यंत पोहचून तिचे प्राण वाचविले. एका छोट्या बोटीच्या मदतीने या मुलीला किनाऱ्यावर आणण्यात आले. त्यानंतर या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली असून रेल्वे पुलावरून का उडी याबाबतचे कारण स्पष्ट झालेले नाही.