देशात ऑनलाईन तसेच एटीएमच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी ओटीपीशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत, असा नियम लागू केला आहे.
एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी बंधनकारक करण्यात आला आहे. 10 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी हा नियम लागू असेल. ग्राहकांना बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल. तो टाकून ग्राहक डेबिट कार्डने 10 हजारांवरील रक्कम काढू शकतात. या नव्या नियमांबाबत बँकेने ट्विट करून माहिती दिली आहे.