मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.
शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बैठकीत मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्या अशा सूचना केल्या आहेत. 10 आणि 12 वी च्या मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षा एक महिना पुढे ढकलावी, अशी सूचना राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण उपसंचालकांसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत केली.
शालेय विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षांच्या काळात अभ्यास आणि लिखाणाचा सराव झालेला नसल्यामुळे ही मागणी केली जात होती. लिखाणाचा विद्यार्थ्यांचा सराव सुटल्यामुळे त्यांना परीक्षेत अडचणी निर्माण होऊ शकतात, तसेच राज्यात सध्या शाळांबाबत ऑनलाइन-ऑफलाईनचा जो काही घोळ सुरू आहे, त्यामुळे देखील विद्यार्थी संभ्रमात आहेत.
म्हणून मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्या अशा सूचना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या बैठकीत केल्या. या ऑनलाईन बैठकीला शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.