जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्तिकी एकादशीच्या वारीला आळंदीला पायी जाणाऱ्या एका वारकरी दिंडीत भरधाव टेम्पो घुसल्याने झालेल्या अपघातात २० वारकरी जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजता वडगाव मावळ जवळील साते गावच्या हद्दीत झाला आहे.
