आई तू काळजी करु नकोस, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई, मी समजून माझ्या बाळाला संभाळ, त्याची काळजी घे,अशा आशयाची चिट्ठी लिहून १ वर्षांपूर्वीच लग्न झालेल्या तरुणाने आत्महत्या केली आहे. पुण्यातील शिवाजीनगर – गोखलेनगर भागातील सुगम चाळीमध्ये राहणाऱ्या निखिल धोत्रे याने रविवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास आयुष्य संपवलं. राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले होते.
सासुरवाडीच्या जाचाला कंटाळून तसेच कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही सुसाईड नोटमध्ये केली आहे.
या घटनेमुळे परिसरात राहणाऱ्या नागिरकांमधून हळहळ व्यक्त होत असून सुसाईड नोट मध्ये मयत तरुणाने कथन केलेल्या कारणांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली जाणार का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.