जालनाः जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील लोणी येथे पोटच्या मुलानं जन्मदात्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. तर, सातऱ्यातही किरकोळ कारणावरुन स्वतःच्याच आईचा खून केल्याची घटना घडली आहे.
दारू पिण्यासाठी पैसै शिल्लक नसल्यानं घरातील गहू, तांदूळ विकायचे आणि दारू प्यायची यासाठी सखाराम शिंदे हा तरूण सकाळी गहू तांदूळ घेऊन निघाला होता. तेवढ्यातच आईने गहू- तांदूळ नेऊ नकोस आपल्याला घरी खाण्यासाठी काहीच उरणार नाही, असा आरडाओरडा चालू केला. आईनं अडवल्याचा राग मनात धरुन आरोपीनं वेळूच्या काठीने आईला मारण्यास सुरुवात केली.
या मारहाणीत त्या मातेच्या डोक्यात मार लागल्याने शेजारील लोकांनी त्यांना आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. आरोपीच्या वडीलांनी आष्टी पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दिली त्यानुसार आरोपी सखाराम शिंदे यांच्या विरुद्ध भादवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.