ताज्याघडामोडी

पोलीस कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळास कंटाळून महिलेने चिट्ठी लिहून घेतला गळफास

महाराष्ट्र पोलीस हा राज्यातील कायदा व न्यायप्रेमी लोकांसाठी सदैव अभिमानाची बाब ठरली आहे पण काही हप्तेबाज,नशेबाज,वसुली बहाद्दर आणि दोन नंबर व्यवसायिकाचे पाठराखण करून महाराष्ट्र पोलिसांच्या गौरवशाली परंपरेला काळिमा फासणारेही काही महाभाग असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे आणि अशा महाभागांच्या मुसक्या आवळ ण्याचे काम देखील कर्तव्यदक्ष पोलीस करीत असल्याचे दिसून आले आहे.     

उस्मानाबाद येथील एका ३२ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली असून या महिलेच्या आत्महत्येस एक पोलीस कर्मचारीच जबाबदार असल्याची फिर्याद सदर महिलेच्या पतीने दाखल केली आहे.सदर महिलेने हरिभाऊ कोळेकर या पोलिसाने माझ्या घरी येऊन बलात्कार केला आणि तो नेहमी मला धमकावत होता व वारंवार बलात्कार करत होता अशी व्यथा मांडली आहे.या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून दोनच दिवसापूर्वी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याविरोधात प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचा गुन्हा घडला होता.त्यामुळे पोलीस खात्यातील अशा नीतिमत्ताशून्य व पदाचा गैरवापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.                 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *