ताज्याघडामोडी

प्रकाश आंबेडकर यांचा संयम सुटला, थेट महाविकास आघाडीलाच गंभीर इशारा; राजकीय वर्तुळात खळबळ

महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत आमचा समावेश करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर वारंवार करत आहेत. मात्र, त्यांचा अद्यापही महाविकास आघाडीत समावेश करण्यात आलेला नाही.

त्यामुळे प्रकाश आंबेडकर अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. आज तर प्रकाश आंबेडकर यांचा संयमच सुटला आहे. त्यांनी थेट आघाडीलाच निर्वाणीचा इशारा दिला आहे. आम्हाला महाविकास आघाडीत घ्या, नाही तर निवडणुकीत तुम्हालाही गाडू, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या इशाऱ्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

प्रकाश आंबेडकर यांची अमरावतीत सभा होती. यावेळी त्यांनी हा गंभीर इशारा दिला. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन दोन वर्षे झाले पण यांच्यात अजूनही समझोता झालेला नाही. जागा वाटप झालं नाही. त्यामुळे मला संशय वाटत आहे. यांना खरंच भाजप आणि मोदींना हरवायच आहे का? हा माझा सवाल आहे. आम्हाला म्हणतात दोन जागा घ्या. यांना काय आम्हाला बळीचा बकरा करायचे आहे काय? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.

तुम्ही आम्हाला चर्चेत घेतलं तर आम्ही तुमच्या सोबत येऊ. पण तुम्ही आम्हाला विचारतच नसाल आणि इथल्या गरीब मराठ्यांसारखा वापर करत असाल तर ते जमणारं नाही. तसं करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर आम्ही भाजपबरोबर तुम्हालाही गाडू, असा इशाराच आंबेडकर यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *