गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुलीने लव्ह मॅरेज केलं, वडिलांनी तीन वर्षांनी बदला घेतला, दीड वर्षांच्या नातीसह तिघांना संपवलं

एखाद्याचा द्वेष कुठल्या थराला जाऊ शकतो याचं एक अत्यंत भयंकर उदाहरण भागलपूरमध्ये पाहायला मिळालं. जिथे मुलीने प्रेमविवाह केल्याने तिच्या घरच्यांनी दीड वर्षांच्या चिमुकलीसह जोडप्याला संपवलं. ही घटना नवगचिया पोलिसांच्या हद्दीतील गोपालपूरच्या नवतोलिया गावातील आहे.

नवतोलिया येथील रहिवासी चंदन कुमार (४०), त्यांची पत्नी चांदनी कुमारी उर्फ चंदा कुमारी आणि त्यांची दीड वर्षांची मुलगी रोशनी कुमारी यांची हत्या करण्यात आली आहे. या तिघांची हत्या दुसरं कोणी नाही तर त्यांच्याच नातेवाईकांनी केली. प्रेमविवाह केल्याच्या रागातून पिता-पुत्राने मिळून ही हत्या केल्याची माहिती आहे. चंदा कुमारीचे वडील प्रमोद सिंग उर्फ पप्पू सिंग आणि त्यांचा मुलगा धीरज सिंग यांनी या तिघांचा अत्यंत निर्दयीपणे खून केला.

पप्पू सिंगने मुलगी चंदा आणि जावई चंदन यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला, तर मुलाने गोळीबार केला. मृत चंदन कुमार आणि चंदा देवी पळून गेले होते आणि २०२१ मध्ये त्यांनी प्रेमविवाह केला होता. यानंतर त्यांना एक मुलगीही झाली. काही दिवसांपूर्वीच हे जोडपं आपल्या दीड वर्षांच्या मुलीसह घरी परतला होता.

मुलगी आणि जावई आई-वडिलांना भेटून त्यांच्या नवीन घरी जात असताना चंदाचे वडील पप्पू सिंग आणि भाऊ धीरज कुमार यांनी तिघांचीही गोळ्या झाडून हत्या केली. याप्रकरणी मृताच्या भावाचे सांगितलं की, आम्ही घरीच होतो. गोळीचा आवाज ऐकून आम्ही बाहेर आलो तर चंदाचा भाऊ धीरज कुमार गोळीबार करत होता आणि तिघांनाही गोळ्या लागल्या होत्या. आम्ही काही करणार तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *