गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गवंडी कामाचे पैसे अडकले होते; मजुरी मागण्यासाठी गेला, मालकाला आला राग, अन् चौघांनी घडवलं धक्कादायक कृत्य

गवंडी कामाची मजुरी मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादात चौघांनी एका मजुराला लाथा बुक्क्यांनी, दगड आणि लाकडी दांड्याने मारहाण करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील येसगाव गाव येथील कमानीजवळ घडली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिपक दादा गांगुर्डे (४०) असे मयत मजुराचे नाव आहे. दरम्यान घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दिपक गांगुर्डे यास ग्रामीण रूग्णालय येथे पाठवले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. दरम्यान दिपकची पत्नी जया गांगुर्डे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यात म्हटले आहे की, येसगाव तालुका कोपरगाव येथील दीपक दादा गांगुर्डे (४०) मजुरी (गवंडी काम) याचे आरोपी उषा सुनील पोळ, स्नेहा सुनील पोळ, राज उर्फ बबलू सुनील पोळ, अण्णा उर्फ अनिल प्रमोद गायकवाड यांना गवंडी कामाचे मजुरीचे राहिलेले पैसे मागितले. या कारणावरून आरोपींना त्याचा राग आला. त्यानंतर तिघांनी शिवीगाळ करून आणि लाथा बुक्क्याने दगडाने मारहाण करून आरोपी अण्णा उर्फ अनिल प्रमोद गायकवाड याने त्याचे हातातील लाकडी दांड्याने दिपकच्या डोक्यात तसेच शरीरावर ठीक ठिकाणी मारहाण केली. यात जबर जखमी करून त्याचा खून केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *