आंध्र प्रदेशमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये अन्नामय्या जिल्ह्यात एका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला लुटण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची हत्या मंगळवारी रात्री करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी केला आहे. शेतकरी नरेम हा गावात दूध द्यायला जात होता, त्यावेळी नरेम यांना हल्लेखोरांनी रोखलं. त्यानंतर त्याचे हात-पाय बांधले. त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली.
६२ वर्षीय नरेश हे एक किलोमीटर लांब असलेल्या नातेवाईकांना दूध द्यायला निघाले होते. नरेम यांच्या पत्नीने सांगितलं की, काही अज्ञात व्यक्ती टोमॅटो खरेदी करण्यासाठी आल्याचे शेतकरी नरेम यांची हत्या केली.दरम्यान, शेतकरी नरेम यांनी काही दिवसांपूर्वीच शेतातील टोमॅटो विकून ३० लाख रुपये कमाविले होते. हत्येचं कारण देखील याच्याशी संबंधित असू शकतं, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलीस अधिकारी केशप्पा यांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी चार पथक गठीत केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, तीन ते चार जणांनी शेतकरी नरेम यांची हत्या केली आहे. तसेच पोलिसांनी शेतकरी नरेम यांच्या कुटुबीयांशी देखील वार्ता केली आहे. शेतकरी नरेम यांचे पत्नी आणि दोन मुली असं कुटुंबं होतं.