ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात पुन्हा अतिमुसळधार पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना अलर्ट

देशातील पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश या ठिकाणी पावसाने हाहाःकार माजवलेला आहे. यामुळे अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. महाराष्ट्रात देखील दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसापासून पुन्हा एकदा चांगली हजेरी लावलेली आहे.

पण तरीसुद्धा अद्यापही महाराष्ट्रातील असे काही जिल्हे आहेत, ज्या ठिकाणी शेतकरी राजा हा चातकाप्रमाणे पावसाची वाट त आहे. जुलै महिन्याचा शेवट जवळ येत असला तरी अद्यापही म्हणावा तसा पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. परंतु मुंबईसह मुंबई उपनगरात, ठाणे, कोकण, विदर्भ या भागातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावलेली यला मिळत आहे. तर आता हवामान विभागाने देखील पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केलेला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात देखील काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. तर, सातारा, सोलापूर, नाशिक, नंदुरबार, ठाणे आणि पालघर ह्या जिल्ह्यांना वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *