ताज्याघडामोडी

महाराष्ट्र शासनाची गाळमुक्त धरण व गाळायुक्त शिवार योजना पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रभावीपणे राबविणार – आ. समाधान आवताडे 

राज्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या पाझर तलावा साठवण तलाव यामधील गाळ काढून तो शेतामध्ये वापरणे ही महत्त्वकांक्षी योजना महाराष्ट्र शासनाने हाती घेतली असून या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक शेत शिवार सुजलाम सुफलाम होण्यास मदत होणार आहे. तरी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घेऊन ही योजना प्रभावीपणे राबवावी असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासन प्रमाणित मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत असणाऱ्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना मंगळवेढा तालुक्याच्या विविध गावातील जलसाठ्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविण्यासाठी शेतकऱ्यांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याचे पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व संपूर्ण देशामध्ये आदर्शवत आणि प्रेरक ठरलेल्या जलयुक्त शिवार या योजनेचे पुरस्कर्ते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत बैठक घेऊन सदर योजना प्रभावीपणे मांडण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. 

त्यानुसार शासनाच्या या योजनेचा मतदारसंघातील विविध जलसाठ्यांमधील गाळ काढून तो गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत विविध भागांमध्ये शेतीसाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे शेती उत्पादनाच्या मर्यादा अधिक पटीने वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासन अंतर्गत विविध योजनांचा अनेक मार्गाने अवलंब केला जाणार आहे सदर योजनेसाठी महाराष्ट्र शासन प्रमाणित मृदा व जलसंधारण विभाग यांच्यावतीने करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध पाझर तलाव व साठवण तलाव योजनेसाठी निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील डोणज, घरनिकी, डोणज, मरवडे (मासाळ मळा), नंदूर ( मुलाणी शेत,मासाळ शेत), बोराळे- डोणज रस्ता, सलगर बु.( हिप्परकर वस्ती), हुलजंती, पडोळकरवाडी, लवंगी, मारोळी, भोसे, शिरनांदगी, डोंगरगाव, तळसंगी जुना- नवा तलाव, लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव, जुनोनी, खुपसंगी, रड्डे, जालिहाळ, पाटखळ, लेंडवे चिंचाळे, सोड्डी, पौट, जंगलगी, खडकी, अकोला, बावची, भाळवणी तसेच पंढरपूर तालुक्यातील कोर्टी, रांझणी, उंबरगाव, गोपाळपूर, शिरढोण असे जलसाठे समाविष्ट केले असून या समाविष्ट गावांव्यतिरिक्त आणखी कोणत्या गावातील शेतकऱ्यांना जलसाठ्यातील गाळ काढून शेतीला वापरावयाचा असल्यास माझ्या संपर्क कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहनही आ आवताडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *