देव्हाऱ्यातील दिव्यामुळे घरात आग भडकून होत्याचं नव्हतं झालं. जळगाव शहरातील जुने जळगाव भागात असलेल्या आंबेडकर नगरात ही घटना घडली. आज (सोमवारी) १९ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दोन घरांना अचानक आग लागली. यामध्ये घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. इतकंच नाही, तर नुकतेच मिळालेले कामाचे पैसेही जळून खाक झाल्याने कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. […]
उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारी चांगलीच वाढली आहे. खून, बलात्कार, दरोडा, विनयभंग अशा घटना सारख्या समोर येत असतात. आता अशीच एक धक्कादायक घटना रामपूरमधून समोर आली आहे. एका भाजप नेत्याच्या आठवीत शिकणाऱ्या मुलीने विनयभंगाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. भाजप महिला मोर्चाच्या नेत्याच्या मुलीने मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही मुलगी आठवीत शिकत होती. […]
कोरोना महामारीमुळे आधीच हॉटेल व्यवसायिक अडचणीत आलेले असून अद्याप ही ते त्यामधून सावरलेले नाहीत. गेल्या दीड वर्षापासून सतत लॉकडाऊनचा त्रास सहन करावा लागत आहे. वास्तविक पाहता पंढरपूर शहर हे आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी या चार यात्रांवर जगणारे व अर्थकारण चालणारे शहर आहे हे सर्वांनाच माहित आहे. त्यातच श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे मंदिर बंद असल्यामुळे या […]