ताज्याघडामोडी

वडिलांनी मारहाण केली म्हणून १४ वर्षीय मुलीने गाठलं प्रियकराचं घर; लग्नाचीही घातली गळ पण…

घरी वडील मारहाण करतात म्हणून एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने चक्क प्रियकरांचे घर गाठलं आणि प्रियकराला लग्नाची गळ घातल्याची घटना औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

आजकाल अनेक मुलामुलींचं एकमेकांवर अगदी शाळेत असल्यापासून प्रेम असल्याचं आपण पाहिलं असेल.शिवाय अल्पवयीन मुलं देखील आपल्या प्रेयसीला घेऊन पळून लग्न केल्याच्या घटना देखील अनेक वेळा घडतात. शिवाय घरचेच मुलांना अयोग्य वागणूक देत असतील आणि त्यांचा छळ करीत असतील तर ती मुलं आपल्या प्रियकरावरती असलेल्या विश्वासामुळे घरच्यांना सोडण्याचा निर्णय घेत असतात.

असाच एक प्रकार औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरात घडला आहे. वडील घरी सतत मारहाण करतात म्हणून एका १४ वर्षीय मुलीने घरातून पळ काढला आणि प्रियकराचं घर गाठलं. परंतु मुलीच्या आई-वडीला पोलिस ठाण्यात गेल्याचे समजतात प्रियकराच्या कुटुंबीयांनी तिला पोलिसांसमोर हजर केलंत्यानंतर मुलीने वडिलांच्या घरी न जाता तीने बालसुधारगृहात जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

त्यामुळे मुलींनी घर सोडून प्रियकराच्या घरी जाण्याचा मार्ग निवडते म्हणजे तिला घरी नक्कीच त्रास दिली जात असेल असं परिसारातील लोक म्हणत आहेत. तर आपल्या मुलांना योग्य वागणूक द्या म्हणजे ते टोकाचं पाऊल उचलणार नाहीत. घर सोडून जाणार नाहीत असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *