जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) हिंदुस्थानातील कोरोना मृत्यूच्या धक्कादायक आकडेवारीचा खुलासा केला आहे. हिंदुस्थानात कोरोनामुळे तब्बल 47 लाख नागरिकांना प्राण गमवावा लागला आहे.
कोरोना बळींचे हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे, असा दावा ‘डब्ल्यूएचओ’ने केला आहे. या आकडेवारीमुळे मोदी सरकार जगापुढे तोंडघशी पडले आहे.
मोदी सरकारने कोरोनामुळे 4 लाख 80 हजार हिंदुस्थानींचा मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. याचदरम्यान ‘डब्ल्यूएचओ’च्या अहवालाने कोरोना मृत्यूचे धक्कादायक सत्य उजेडात आले आहे. हिंदुस्थानातील कोरोना बळींचे प्रमाण हे जगातील एकूण कोरोना मृत्यूच्या तुलनेत एकतृतीयांश इतके आहे. जगभरात जवळपास दीड कोटी कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.