सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेस भले जिल्हा परिषद,पंचायत समिती,जिल्हा बँक,दूध संघ आणि आमदारकी पदरात पाडून घेणे गेल्या २५-३० वर्षाच्या राजकरणात अपवादाने जमले असले तरी सामान्य जनतेच्या हितासाठी,न्यायासाठी लढणारे शिवसैनिक हीच तर खरी शिवसेनेची जिल्ह्यात ओळख राहिली आहे.सत्ता असो अथवा नसो,त्यामुळेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि सामान्य शिवसैनिक यांचा जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयात मोठा वचक असल्याचे मागील ३० वर्षात पहावयास मिळाले.२५ वर्षांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी दस्तुरखुद्द शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेचा मुख्यमंत्री आरूढ झाला पण सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना हि सध्यातरी अदखलपात्र असल्याचेच राष्ठ्रवादी कॉग्रेसच्या पालकमंत्र्यांसह वि