ताज्याघडामोडी

राज्यात 3 आणि 4 फेब्रुवारीला पावसाची शक्यता, शेतकऱ्यांचे होऊ शकते नुकसान

मागील तीस वर्षांत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याची नोंद अति थंड आठवडा म्हणून झाली आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक रामचंद्र साबळे यांनी दिली.

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात वातावरण बदल होत आहे. या वातावरणीय बदलामुळे राज्यात थंडीचे प्रमाण वाढत चालले आहे. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 3 आणि 4 फेब्रुवारीला राज्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

या वातावरणीय बदलामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामानात जे बदल सध्या होत आहेत त्याला प्रदूषण हे मुख्य कारण असल्याचेही साबळे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *