कोरोना लसीचा दुसरा डोस न घेणाऱयांवर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्याची वेळ आली तरी अनेकांनी दुसरा डोस घेतला नाही. त्यामुळे वेळ येऊनही दुसरा डोस घेणाऱयांवर काही बंधने आणण्याचा विचार सुरू असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
अजित पवार म्हणाले, देशात आणि राज्यात मोठय़ा प्रमाणात लस शिल्लक आहे. राज्यात पहिला डोस घेऊन 84 दिवस झाले आणि दुसरा डोस घेतला नाही अशा लोकांची संख्या जवळपास दीड ते पावणेदोन कोटी आहे. त्यामुळे वेळ येऊनही दुसरा डोस न घेणाऱयांवर काही बंधने आणण्याचा विचार करतोय, जेणेकरून ते दुसरा डोस घेतील, असेही अजित पवार यांनी म्हटले.
ओमायक्रोनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सशी चर्चा केली आहे. संसर्गाबाबत वेगवेगळ्या प्रकारची मते ऐकायला मिळत आहेत. डोंबिवलीतील रुग्ण होता तो बरा झाला आहे. या रुग्णामुळे इतर बाधित झाले नाहीत. ओमायक्रोनबाबत समज, गैरसमज असून केंद्र सरकारने ते दूर करावेत, असेही त्यांनी म्हटले.