राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे राज्यात पावसाळी स्थिती राहण्याची शक्यता आहे.
७ नोव्हेंबरला कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे, तर राज्यातील अनेक काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
तर राज्यातील पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
तरहवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आजपासून तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे राज्यात पावसाळी स्थिती राहण्याची शक्यता आहे.