सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि संतुलित आहार या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित केले होते. अन्न ही मानवी जीवनाचे अस्तित्व टिकवण्यास आवश्यक अशी प्राथमिक गरज आहे. शरीराची वाढ होणे, झीज भरून काढणे, ऊर्जा निर्मिती,कार्यशक्ती हे अन्नामुळे घडून येते. त्यामुळे आहारामध्ये संतुलित आहार व पोषण दृष्ट्या समतोल हवा. या कार्यक्रमासाठी पहिली ते चौथी या गटासाठी डॉक्टर अस्मा तांबोळी व चौथी ते नववी गटासाठी डॉक्टर झीनत तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्व सांगून संतुलित आहार कसा घ्यावा व बेकरीचे पदार्थ, फास्ट फूड हे कसे टाळावे याबद्दल सांगितले. हा कार्यक्रम संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या मार्गदरहनाखाली व प्राचार्य सिकंदर पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल लिगाडे व सतीश देवमारे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप समाधान खांडेकर व निसार इनामदार यांनी केला. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी व पालक वृंद ऑनलाइन उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Related Articles
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात बारामती भेटीत चर्चा
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात बारामती भेटीत चर्चा बंद खोलीत चर्चा झाल्याने चर्चेला उधाण उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार शिवेंद्रराजे यांची जवळीक लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच शिवेंद्रराजे भोसले यांनी पवार यांच्या सातारा दौऱ्यावेळी त्यांची भेट घेतली होती. ते आता थेट बारामतीला भेटीसाठी आले होते. या दोघांच्यात बंद खोलीत झालेल्या चर्चेचा […]
उजनी धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडा
गेल्या अनेक दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे.समाधान पाऊसही झालेला नाही.शेतकऱ्यांनी ऊस,फळबागा,खरीप पिके व चाऱ्याची पिके घेतली आहेत त्यांना पाण्याची कमतरता भासत आहे.तर अनेक गावच्या पाणी पुरवठा योजनांनाही पाण्याची कमतरता भासत आहे.उजनी धरणात सध्या ६२ टक्के उपयुक्त जलसाठा झालेला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाण्याची गरज लक्षात घेऊन उजनी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडण्यात […]
सरकोलीच्या भीमा नदीकाठावरून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांची पुन्हा कारवाई
पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील भीमा नदीच्या पात्रातून सातत्याने अवैध वाळू उपसा होत असल्याच्या घटना तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघडकीस येत असून रविवारी रात्री पुन्हा एकदा पंढरपूर तालुका पोलिसांनी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत एक टेम्पो,एक ट्रॅक्टर व वाळू असा ७ लाख ६ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.गेल्या महिना भरात सरकोली परिसरातील भीमा नदीतून होणाऱ्या अवैध वाळू उपशावरील तालुका […]