जळगावच्या शेतकऱ्याने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. तर दुसरीकडे मंत्रालयाच्या परिसरात शेतकऱ्याने प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.दरम्यान, पोलिसांनी वेळीच शेतकऱ्याला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
सुनील गुजर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतीत झालेले मोठे नुकसान, घर गहाण पडले आहे. आर्थिक चणचण आहे, त्यामुळे शेतकऱ्याने आत्महदनाचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे.