कुटूंब म्हणले कि भाडणं आलेच,आणि ज्या संसारात पती-पत्नी एकमेकांशी भांडत नाहीत त्या संसारात काहीतरी उणीव आहे असे म्हटले जाते.संसार कितीही प्रेमाचा असला तरी भांड्याला भांडे लागण्याचे निमित्तही भांडण सुरु होण्यास कारणीभूत ठरते असे म्हटले जाते.भांडण झाले कि मग आदळआपट आली,रुसवा आला,पतिराजाच्या जेवणाची आबाळ आली आणि नंतर गोड समझोताही आलाच.पण एखादया वेळी किरकोळ कारणावरून सुरु झालेले भांडण विकोपाला जाते.
असाच प्रकार पंढरपूर तालुक्यात घडला असून माहेरी जाण्याचा हट्ट करीत असलेल्या पत्नीला पतीने नंतर जा असे सांगत पती झोपी गेला.आणि रात्री १२ वाजता त्याला जाग आली ती बायकोने डोक्यात क्रिकेटच्या बॅटने प्रहार केल्यानंतरच.बायकोने बॅटचे आणखी दोनचार फटके लागवल्यानंतर आरडा ओरडा ऐकून घर गोळा झाले आणि पतिराजाची सुटका झाली.
या प्रकरणी करकंब पोलीस ठाण्यात सदर पतीने आपल्या पत्नी विरोधात फिर्याद दिली आहे.