गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रियकराच्या आत्महत्येनंतर 15 दिवसाने तिनेही गळफास घेत केली आत्महत्या

औरंगाबाद | येथील एकता नगरमध्ये राहणाऱ्या एका 17 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. पंधरा दिवसापूर्वी विवाह ठरलेल्या मुलाने आत्महत्या केल्याच्या तणावातून हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे.हाती आलेल्या माहिती नुसार, खुशी रमेश कलवले (वय १७, रा.गायकवाड हौसिंग सोसायटी, एकता नगर, जटवाडा रोड ) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

खुशी पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून पार्लरचे काम करत होती. खुशीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांना विवाह करायचा होता. यासाठी दोघांनी घरच्यांचे एकमत करून तिने महिन्यापूर्वी विवाह ठरवला होता. परंतु विवाह ठरलेल्या तरुणाने १५ दिवसांपूर्वी आत्महत्या केली. यामुळे खुशी पंधरा दिवसांपासून तणावात होती. त्याचवेळी शनिवारी दुपारी आई घरा बाहेर दळण करत असताना खुशीने स्वयंपाक घरात सिलिंग फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला.

घडलेला प्रकार आईच्या लक्षात येताच नागरिकांच्या मदतीने खुशीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव जाधव करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *