मुंबई : राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, अशी शक्यता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या वक्तक्यामुळे वर्तवली जात आहे. कोरोनामुळे हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध भागांमध्ये शाळा सुरू केल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता खबरदारी म्हणून दहावी-बारावीची लेखी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे तामिळनाडू राज्यात दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही असा निर्णय घेतला जाऊ शकतो. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलंय.
Related Articles
पुणे पदवीधर साठी वंचित बहुजनच्या वतीने प्रा.सोमनाथ साळुंखे यांना उमेदवारी
पुणे पदवीधर साठी वंचित बहुजनच्या वतीने प्रा.सोमनाथ साळुंखे यांना उमेदवारी पुणे पदवीधर मतदार संघ 2020च्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रा.सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर येथील नुकत्याच झालेल्या मेळाव्यात प्रा. साळुंखे यांच्या उमेदवारी ची घोषणा केली. या बाबतचे अधिकृत पत्र पार्टीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले […]
मुलाचं प्रेम बापाला अमान्य; तरुणीचा काटा काढण्याचं ठरवलं, कटात तरुणाची साथ अन् तरुणीसोबत विश्वासघात
आपल्या मुलाचे एका २२ वर्षीय महिलेशी असलेल्या अनैतिक संबधाला विरोध असल्याच्या वादातून बापाने मुलासह एका साथीदारानी संगनमत करून खुनाचा कट रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंग गडाच्या फेनिक्युलर रोपवेच्या जवळील झुडुपांमध्ये घडली होती. या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणच्या आधारे एका आरोपीला […]
कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज शेळवे येथे “फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन एन.बी.ए. क्रायटेरीया” या कार्यशाळेचे आयोजन
आज बुधवार, दि.२८.०४.२०२१ रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित, कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज मौजे शेळवे ता.पंढरपूर येथे IQAC Cell या विभागाने “एन.बी.ए. क्रायटेरीया विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम” या कार्यशाळेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन केले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून जेएसपीएम राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, ताथवडेचे प्राध्यापक डॉ.श्री.अजय पैठणे सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे विश्वस्त मा.श्री.रोहन […]