गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शेताच्या बांधावरच घडली धक्कादायक घटना, वाद विकोपाला गेल्यावर झाडली गोळी, बापलेकाचा गेला जीव

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मलगाव येथे शेतीच्या बांधावरून झालेल्या वादादरम्यान थेट गावठी कट्ट्याने फायरिंग करण्यात आली आली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. तर यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील मलगावचा पिपलीपाडा येथे दोन परिवारांमध्ये हा वाद झाल्याचे बोलले जात आहे. सकाळी शेतात कामानिमित्त सर्व खर्डे परिवार शेतात गेले होते. या खर्डे परिवारात शेताच्या बांधावरून नेहमी छोटे मोठे वाद होत असत. नेहमीच होणाऱ्या वादामुळे आज या परिवारात हाणामारी झाली.

गणेश खर्डे यांच्याकडे आलेल्या पाहुण्याने (संशयिताचे नाव माहित नाही) मलगाव येथील २४ वर्षीय अविनाश सुकराम खर्डे या अविवाहित तरुणावर बंदुकीने फायरिंग केल्याचे बोलले जात आहे. यात अविनाश खर्डे याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमींना तात्काळ खाजगी गाडीने शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये असलेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या घटनेत सुकराम खर्डे आणि अविनाश खर्डे या दोघांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *