ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना सेवा सुविधा देण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज

अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या श्री.क्षेत्र पंढरपूर येथे दि.२९/६/२०२३  रोजी आषाढी यात्रा भरत असुन येणा-या लाखो भाविक वारक-यांना सेवा सुविधा पुरविण्याकामी पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज झालेली आहे. या आषाढी यात्रा कालावधीमध्ये महाराष्ट्र संपूर्ण देश विदेशामधुन मधून आपली पूर्व परंपरा चालत आलेली वारी पोहोचविण्यासाठी अनेक भाविक पंढरपूर मध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. तसेच सर्व मानाच्या पालख्या दिंड्या या वारकरी, फडकरी यांच्या समवेत पंढरपुरात दाखल होतील या आलेल्या भाविकांना चांगली सेवा सुविधा मिळावी म्हणून नगर परिषदेने संपूर्ण तयारी केली असून  ही यात्रा सुरळीतपणे पार पाडावी म्हणून नगर परिषदेची सर्व अधिकारी कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. यात्रेकरुंना यात्रा कालावधीमध्ये खालीलप्रमाणे सुविधा देण्यात येणार आहेत.

नगरपरिषदेने शहरातील प्रमुख रस्त्याचे डांबरीकरण व ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या ठिकाणी पॅचवर्क करणेचे काम हाती घेतले असून विशेषता व्हीआयपी रोड,संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग, तनपुरे महाराज मठ, कैकाडी महाराज मठ, 65 एकर, गोपाळपूर दर्शन बारी पालखी मार्ग इसबावी येथे रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. तसेच अर्बन बँक ते नाथ चौक, सावरकर पुतळा ते महाद्वार, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, अंबाबाई पटांगण, चंद्रभागा वाळवंट येथील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली आहे  पोलीस प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण काढण्याचे काम चालु आहे. तसेच वाळवंटात येणा-या यात्रेकरुंना वाहनांची वाहतुकीची सोय व्हावी म्हणुन जुना पुल ते पुंडलिक मंदीर व या मुख्य रस्त्याला लागुन नदीपर्यंत उपरस्त्याची आखणी करण्यात आली आहे. तसेच पुंडलिक मंदीर ते दगडी पुलापर्यंत 9 हायमास्ट दिवे, प्रत्येक घाटासमोर असलेल्या लोखंडी पोलवर 200 वॅट एलईडी दिवे लावण्यात आले असुन सदर दिव्यांचा प्रकाश संपुर्ण वाळवंटात पडणार आहे. त्याचप्रमाणे यात्रेकरुंच्या सोईसाठी संपुर्ण दर्शन बारी मार्ग, 65 एकर मध्ये 160 एलईडी दिवे व 6 हायमास्ट बसविण्यात आले आहेत.

तसेच 65 एकर मध्ये असलेल्या 1800 शौचालयामध्ये विजेची व्यवस्था करण्यात आलेली असून पाण्याच्या टाकी द्वारे व टँकरद्वारे शौचालयाच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अनिल नगर येथील पाण्याच्या टाकीवरुन स्वतंत्र पाईप लाईन द्वारे यात्रेकरुंना पिण्याचे पाणी मिळावे या हेतुन नदीच्या वाळवंटामध्ये 45 नळ बसविण्यात आले आहेत. तसेच वाळवंटात यात्रे पूर्वी विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली असुन  संपुर्ण वाळवंट दररोज स्वच्छ करणेत आले होते व ६० ते ७० टन नदी पात्रातील  कचरा काढण्यात आला  आहे. तसेच उघड्यावर शौचास बसु नये म्हणुन विशेष टीम नेमण्यात आली आहे. तसेच नदी पात्र, पत्राशेड दर्शनबारी, 65 एकर, मंदिर परिसरात व शहरात आगीची दुर्घटना होवु नये म्हणुन 24 तास भक्ती सागर मंदिर समिती जवळ, पत्रा शेड दर्शन बारी, अग्निशमन केंद्र, हेलिपॅड,नदी पात्र येथे अग्निशमन वाहने उभे  करण्यात आलेले आहेत  पत्रा शेड, नविन अग्निशमन केंद्र, चंद्रभागा नदी वाळवंट तसेच मंदीरा भोवती आग लागल्यास अग्निशमन वाहनास त्वरीत पाणी उपलब्ध व्हावे म्हणुन मंदीराच्या दक्षिण बाजुस फायर हायड्रेट उभा केला आहे. भाविकांसाठी यात्रा कालावधीमध्ये मंदीर परिसरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येत आहे . गोपाळपुर रोड दर्शन बारी पत्रा शेडमध्ये पिण्याचे पाणी नळ कनेक्शन द्वारे उपलब्ध करुन दिले आहे. या ठिकाणी आतील बाजुस शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात एकुण 65 हातपंप व मंदिर परिसरातील विद्युत पंपाद्वारे यात्रेकरुंना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच यात्रा कालावधीत १२९ टँकर द्वारे संपुर्ण शहरात उपनगरात व महाआरोग्य शिबिर, दर्शन बारी पत्राशेड, भक्ती सागर 65 एकर या ठिकाणी व विशेष: ज्या ठिकाणी मठांची संख्या जास्त आहे त्याठिकाणी सुद्धा पाणी पुरवठा करण्यात येत आहे आहे. यात्रा कालावधीत पुर्वी शहरामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली असुन यात्रा कालावधीमध्ये शहरात स्वच्छता रहावी म्हणुन नियोजन बद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. नगरपरिषदेच्यावतीने 1400 सफाई कर्मचा-यांद्वारे व उपनगरात स्वच्छता करण्यात येत आहे. तसेच यात्रा कालावधीमध्ये शहर, वाळवंट, 65 एकर प्रत्येक मोठ्या मठांमध्ये स्वतंत्ररित्या कचरा साठविण्यासाठी लोखंडी बॅरेल ठेवण्यात यावे अशी सुचना मठाधीपतींना देण्यात आलेली आहे. तसेच 41 घंटागाडी द्वारेही कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत अहोरात्र चालु राहणार आहे. शहरामध्ये कचरा त्वरीत उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील 4 टिपर, 2 कॉम्पॅक्टर, 1 डंपरप्लेसर, 4 डंपिंग ट्रॉलिने व जेसीबीच्या सहाय्याने दररोज 100 ते 120 टन कचरा उचलण्यात येणार आहे. नदीपात्र व शहरातील विविध ठिकाणी पुरुष व महिलांसाठी प्रसाधनगृहे उभारण्यात आली आहेत.तसेच मठामधील राहणा-या वारक-यांना  भोजन दिले जाते  सदर जेवणा वेळी  राहिलेले अन्न हे पत्रावळी व द्रोण इतर कचरा रस्त्यावर टाकु नये म्हणुन मठाधिपती यांना सुचना दिल्या असुन या मठांना स्वंतत्र घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यामुळे रस्त्यावर पडणारी घाणीचे  प्रमाण अतिशय कमी झाले आहे. बायोकल्चर तंत्राचा वापर करुन जैविक पद्धतीने नदीच्या पात्रात होणारी घाण दुर्गंधीयुक्त वास कचरा व घाण कुजविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे. शौचालय नियोजनामध्ये तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत व सुलभ

शौचालयाची 29 ठिकाणी 2054 सीट्स, नगरपरिषदेची कायमची 25 ठिकाणी 176 सीट्स, 65 एकर परिसरातील कायम स्वरुपी 12 ठिकाणी 1864 सीट्स, प्री फॅब्रिकेटेड (नदी वाळवंट, 65 एकर, पत्राशेड दर्शनबारी, शहरात विविध ठिकाणी) असे एकुण 17 ठिकाणी 500 सीट्स असे शौचालयाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच यात्रा कालावधीत मोकाट जनावरे पकडुन त्यांना शहराबाहेर सोडण्यात येत आहेत. तसेच शहरातील न.पा.चे बोअर मठातील विहीरी, आडामध्ये मदर सोल्युशन टाकण्यात आले आहे.शहरात यात्रा कालावधीमध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने पत्राशेड दर्शनबारी, पोलीस संकुल, दर्शन मंडप, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, वेदांत भक्त निवास, नागरी आरोग्य केंद्र, महाद्वार पोलीस चौकी या 8 ठिकाणी यात्रेकरुंच्या सोईसाठी प्रथमोपचार केंद्र उघडण्यात आले आहेत. तसेच यात्रा कालाधीत कॉलरा हॉस्पिटल येथे 50 कॉटचे हंगामी स्वरुपाचे रुग्णालय स्थापित करण्यात आले आहे. तसेच यात्रा कालाधीमध्ये संपुर्ण यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी 65 एकर, नदी वाळवंट, गोपाळपुर रोड दर्शन बारी पत्रा शेड, पंढरपूर नगरपरिषद मुख्य कार्यालय, तुकाराम भवन अशा 5 ठिकाणी आपातकालिन व्यवस्थापन केंद्राची (EOC) स्थापना केलेली आहे. यात्रा व्यवस्थित पार पडावी म्हणुन पंढरपूर नगरपरिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, नगरअभियंता नेताजी पवार, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर, पाणीपुरवठा अभियंता आत्माराम जाधव, प्रितम येळे, विद्युत अभियंता राजकुमार सपाटे, रोडलाईट इन्स्पेक्टर संतोष क्षिरसागर, अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले , सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. तसेच यात्रा कालावधीमध्ये शहरातील सर्व स्थानिक नागरीकांनी स्वच्छता व आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *