उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
कोश्यारी यांनी राज्यपाल असताना अनेकदा सावित्रीबाई आणि महात्म फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधानं केली होती. हा दोरा धरुन उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला. उद्धव ठाकरे हे खेडमधील गोळीबार मैदानात आयोजिक करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलत होते.
“एक काळी टोपीवाला होता, गेला. त्याने शिवाजी महाराज यांचा अपमान केला, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. तरीही यांच्या शेपट्या बाहेर येत नाहीत. दिल्लीसमोर शेपटी आत घालून बसणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हते, कदापी नव्हते”, असं उद्धव यांनी ठणकावून सांगितलं.