शेतकरी जिद्दीला पेटला,कोर्टात घेतली होती धाव
गेली सात वर्षे अधिग्रहीत जमिनीचा मोबदला देण्यात शासन अपयशी ठरल्यानं शेतकऱ्यानं कोर्टात धाव घेतली होती. याआधीही अशाच पद्धतीने कोर्ट आदेशाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातील साहित्याची जप्ती करण्याबाबत आदेश निघाला होता. मात्र न्यायालयाला भरपाई देण्याचे आश्वासन दिल्याने ही जप्ती टळली होती.
सुमारे नऊ लाखावर रक्कम द्या अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीसह अन्य साहित्याची जप्ती करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, याची माहिती बोहरा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. कोर्टाच्या आदेशाची माहिती मिळताचं प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली या प्रकाराची चर्चा जिल्ह्यात होत आहे.दरम्यान उशिराने जिल्हाधिकारी कार्यालयाने न्यायालयाकडून दोन दिवसांसाठी स्थगिती आणली. त्यामुळे जप्ती टळली आहे.
.