ताज्याघडामोडी

राज्यात तुफान बरसणार, या जिल्ह्यांना पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

परतीच्या पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पाऊस आणखी काही दिवस थैमान घालण्याची शक्यता आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना राज्यात अजूनही पावसाचा जोर मात्र कायम आहे. त्यामुळे, यंदाची दिवाळीही पावसातच जाणार असल्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज आणि उद्या (मंगळवारी) मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

दिवाळी काही दिवसांवर आल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. मात्र, पाऊस खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांचा हिरमोड करण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. तर पालघर जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्येही मंगळवारपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *