ताज्याघडामोडी

उस्मानाबाद, औरंगाबादच्या नामांतराची प्रक्रिया पूर्ण; खैरेंचं मोठं विधान

राज्यातील उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या नामांतराबाबत एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. या दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना कार्यकर्त्यांची बऱ्याच दिवसांपासून अशी मागणी होती असे खैरे यावेळी म्हाणाले.

कार्यकर्त्यांची इच्छा खूप होती, धाराशिव व संभाजीनगर नावे अधिकृत कधी होणार अशी विचारणा केली जात होती, पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी मुंबईच्या भाषणात सांगितलं की आपण म्हणतोच संभाजीनगर, त्यावर अनेकांनी प्रश्न केले की ही नावे अधिकृत कधी करणार. धाराशिव आणि संभाजीनगर या नावांची कायदेशीर तयारी पुर्ण झाली आहे. ते कधीही जाहीर करतील असे खैरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *