लग्न समारंभ म्हटले कि तरुणाईच्या उत्साहाला उधाण आलेलं असते.खास मित्राचे लग्न असेल तर त्या वरातीत सारे काही विसरून बेभान नृत्य करणारे तरुण हे तर नेहमीचेच दृश्य परंतु लग्नाच्या वरातीत जेव्हा एखादी अघटित घटना घडते तेव्हा नक्कीच त्याची चर्चा होते.अशीच एक घटना बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या शिंदेवाडीमध्ये माने-कोळसे यांचा शुभविवाहाचे प्रसंगी घडली असून यात लग्नाच्या मिरवणुकीत बेधुंद नाचणं, एका 25 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. आपल्या मित्राच्या लग्नात निघालेल्या मिरवणुकीत बेधुंद होऊन नाचल्यानंतर, तरुणाला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणि यातच तरुणाचा मृत्यू झाला आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या शिंदेवाडीमध्ये माने-कोळसे यांचा शुभविवाहाचे आयोजन करण्यात आले होते.
या लग्नातील नवरा-नवरी दोघेही शिंदेवाडी गावातील रहिवासी आहेत. मिरवणूक लग्नस्थळी मंडपात येताच, मयत वैभव राऊत मित्रांसह खुर्चीवर बसला व तेथे बसून त्याने तहान लागल्याने गटागटा पाणी पिले. यावेळी त्याला लगेच हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्याला तात्काळ माजलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.