स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देण्यात येणाऱ्या 27 टक्के आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आज बुधवारी निवाडा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.
राज्य सरकारने सदर प्रकरणाची सुनावणी तातडीने घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार 28 फेब्रुवारी रोजी यावर सुनावणी होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने नगर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील नगर पंचायतीच्या आरक्षणाचे प्रकरण ओबीसी आरक्षणाच्या याचिकेशी जोडून घेण्याची विनंती केली होती.
त्यामुळे 28 फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली नाही. आता आज ही सुनावणी होत आहे. 3 मार्च रोजी राज्यातील प्रभागांचे नवे प्रारूप आराखडे अंतिम होणार आहेत. त्यानंतर लवकरच प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे आज ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्यास कोंडी फुटणार आहे.