ताज्याघडामोडी

हिंदुस्थान-पाकिस्तान सामना रद्द करा, रामदास आठवले यांची मागणी

ICC T20 वर्ल्ड कप लवकरच सुरू होणार आहे. 24 ऑक्टोबर रोजी ‘हाय व्होल्टेज’ सामना म्हणजे हिंदुस्थान-पाकिस्तानचा सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे.

खुद्द केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील हा सामना खेळण्यावर आक्षेप घेत रद्द करण्याची मागणी केली आहे.

पत्रकारांसोबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवणं चुकीचं आहे. हा सामना थांबवला पाहिजे. खेळाडूंनाही पाकिस्तानविरुद्ध खेळण्यापासून रोखलं पाहिजे. यासंदर्भात मी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिणार आहे.

रामदास आठवले यांच्या आधी एमआयएमचे खासदार ओवैसी यांनी देखील हा सामना खेळवला जाऊ नये अशी मागणी केली आहे. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असताना, हिंदुस्थानी नागरिकांवर हल्ले करत असताना त्यांच्याशी सामना खेळणं चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *