पुणे शहरासह पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असून त्यामुळे उजनी धरणात दौण्डहून येणाऱ्या निसर्गात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात पुढील तीन ते चार दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी होईल असा अंदाज वर्तविला असून त्यामुळे उजनी धरण व्यस्थापन सतर्क झाले आहे.आज रात्री ९ वाजता उजनी धरणातून ५ हजार क्युसेक्स वेगाने भीमा नदीत पाणी सोडले जाणार असल्याची माहिती पंढपुरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या बाबत प्रांताधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहिती नुसार आज रात्री ८ वाजता उजनी धरणाचा उपयुक्त साठा १०८% इतका झाला असून सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच आहे.यामुळे दौण्डहून निसर्गात वाढ होण्याची शक्यता असून पुरनियंत्रणाच्या दृष्टीने धरण व्यवस्थपणाने आज रात्री ९ वाजले पासून ५ हजार क्युसेक्स प्रमाणे पाणी सोडण्याचे निश्चित केले.या विसर्गात परिस्थिती पाहून कमी जास्त करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.