ताज्याघडामोडी

दोन वर्षापासून पुरग्रस्ताचे अनुदान रखडले

2019 आली भीमा नदीला आलेल्या महापुरात मध्ये शेती पिकाच्या झालेले नुकसानमुळे पंढरपूर तालुक्यातील शेती पिकांचे पंचनामा होऊन सुद्धा बाधित शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत नुसकान भरपाई मिळाली नसून गेली दोन वर्ष होऊसुद्धा अध्याप नुसकान भरपाई मिळालेली नसून त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील 700ते800 शेतकरी वंचित राहिले असून यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेला आहे तरी त्वरित नुसकान भरपाई मिळावी सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांनी अपेक्षा व्यक्त केले.

महापुरामुळे बाधित झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुसकान भरपाई मिळालेली आहे मात्र पंढरपूर तालुक्यातील 700 ते 800 शेतकरी अध्याप एक दमडीही मिळाली नसून त्वरित शासनाच्या वतीने नुसकान भरपाई द्यावी अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल अशा आशयाचे पत्र तहसीलदार व प्रांतअधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाअध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, जिल्हासंघटक शेखर कोरके, सर्जेराव शेळके, रामेश्वर झांबरे,नितीन गावडे, औदुंबर सुतार, विष्णू भोसले,अनंता लामकाने, अंबादास भोई,अनिल शिंदे, रणजित शिंदे,सुरज भांगे मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *