गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

५ होड्यातून होत होता अवैध वाळू उपसा १ सापडली ४ होड्या पळून गेल्या

 

पंढरपूर तालुक्यातील आंबे गावच्या हद्दीतून भिमानदीच्या पात्रातून करण्यात येणारा अवैध वाळू उपसा आणि वाहतूक हा पंढरपूर तालुक्यात कायम चर्चेचा विषय ठरला आहे.या ठिकाणाहून करण्यात येणाऱ्या अवैध वाळू उपशावर व वाहतुकीवर पंढरपुर तालुका पोलिसांकडून वारंवार कारवाई केली तरी पुन्हा येथून अवैध वाळू उपसा करणाऱ्याचे उधोग काही थांबत नसल्याचेच वारंवार होणाऱ्या पोलीस कारवाईमुळे दिसून येते.जिल्ह्यात वाळूचे लिलाव रखडल्यामुळे अवैध वाळू उपसा हे महिन्याकाठी लाखो रुपये मिळवून देणारे साधन झाल्याचे दिसून येते.वास्तविक पाहता या गौण खनिजाचे रक्षण करण्याची जबाबदारी हि संबंधित नदीकाठच्या गावातील तलाठी,मंडल अधिकारीयांची आहे.तलाठी,कोतवाल हे पद निवासी असल्याने डोळ्यात तेल घालून सरकारी मालमत्तेचे अर्थात वाळूसह गौण खनिजाचे रक्षण करणे,वेळप्रसंगी कारवाई करणे,कारवाई करत असताना आवश्यकता वाटल्यास पोलीस ठाण्यास वर्दी देऊन त्यांची मदत घेणे हा यांच्या कर्तव्याचा भाग समजला जातो.गावच्या नदीकाठच्या विविध गटाच्या हद्दीत नदीमध्ये व परिसरात किती वाळू साठा आहे याचे मोजमाप ठेवणे, त्याची माहिती जिल्हा महसूल अधिकारयांना कळविणे अपेक्षित असते.वाळू साठ्याची चोरी होऊ नये यासाठी शासनाने टोटल स्टेशन सिस्टीम प्रणालीद्वारे वाळू साठ्यांचे मोजमाप केले जावे आणि या वाळूसाठ्यांचे रक्षण केले जावे असे आदेश वेळावेळी काढले आहेत.मात्र गेल्या दीड वर्षाच्या कालावधीचा विचार करता तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर बहुतांश कारवाया या पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतः माहिती प्राप्त करूनच केल्याचे आढळून येते.

       गेल्या आठवड्यात आंबे येथीलच एका नदीकाठच्या शेतकरी पितापुत्रास अवैध वाळू उपसा करण्यासाठी वाट देत नाही म्हणून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली होती.या नंतर बहुतेक महसूल प्रशासन आंबे परिसरातून होणार अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सक्रिय झालेले असतानाच  दिनांक 08/09/2021 रोजी आंबे परिसरातील भीमा नदीच्या पात्रातून भरदिवसा पुन्हा अवैध वाळू उपसा सुरु असल्याचे समजताच आंबे येथील तलाठी प्रकाश तानाजी गुजले व कोतवाल महादेव खिलारे हे नदीपात्राकडे गेले असता त्या ठिकाणी 5 होड्याच्या माध्यमातून नदीपात्रातून वाळू काढली जात असल्याचे दिसून आले.यावेळी तलाठी आणि कोतवाल यांनी ठोस कारवाई करण्याचा प्रयत्न केला खरा पण केवळ एकच होडी ताब्यात घेण्यास त्यांना यश आले.बाकीच्या ४ होड्या पोहोरगावचा बाजूने पळून गेल्या.
या प्रकरणी तलाठी प्रकाश तानाजी गुजले यांनी पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात 1)सागर प्रकाश साळुंखे वय 23 वर्ष 2)नाना भगवान खिलारे वय 28वर्ष 3)दत्ता लक्ष्मण निळे वय27 वर्ष 4) सचिन भगवान खिलारे वय 25 वर्ष 5) राहुल राजाराम पुजारी वय 25 वर्ष सर्व रा आंबे ता पंढरपूर यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम379,34सह गौण खनिज कायदा 1978 चे कलम 4(1),4(क)(1) व 21 सार्वजनिक संपत्ती नुकसान कायदा कलम 3,4 प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे.  
              

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *