ताज्याघडामोडी

तालिबान तितकेच दहशतवादी आहे जितके रामायण लिहिणारे वाल्मिकी

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा हे सध्या शायरीमुळे कमी आणि त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून अधिक चर्चेत असल्याचे दिसत आहे.एका खाजगी वाहिनीशी बोलताना ते म्हणाले आहेत की, तालिबान तितकेच दहशतवादी आहेत, जितके रामायण लिहिणारे वाल्मिकी. राणा यांना विचारण्यात आले होते की तालिबान ही दहशतवादी संघटना आहे की नाही? यावर ते म्हणाले, वाल्मिकी यांनी रामायण लिहिली तर ते देव झाले. त्यापूर्वी ते दरोडेखोर होते. माणसाचे चारित्र्य बदलत असते.

दरम्यान, अलीकडेच मुनाव्वर राणा यांनी उत्तर प्रदेशात पुन्हा योगी आदित्यनाथ यांचे सरकार स्थापन झाल्यास ते यूपी सोडणार असल्याचे जाहीर केले होते. ते म्हणाले होते की, ‘जर योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले, तर मी समजेल की हे राज्य मुस्लिमांना राहण्यासाठी योग्य नाही.’

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *