ताज्याघडामोडी

भूल थापानां बळी पडू नका, विकास व रोजगाराचे मुद्दे घेऊन जनतेसमोर या, भावनिक झाल्यावर पोट भरत नाही — भाजप उमेदवार समाधान आवताडे

भूल थापानां बळी पडू नका, विकास व रोजगाराचे मुद्दे घेऊन जनतेसमोर या, भावनिक झाल्यावर पोट भरत नाही — भाजप उमेदवार समाधान आवताडे 

  मंगळवेढा- भाजप व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांचा शनिवारी पंढरपूर शहरात प्रचार रॅली तसेच घरभेट दौरा झाला, त्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवेढा व पंढरपूर मध्ये सभा झाली, त्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील देगाव, शरद नगर, घरनिकी, मारापूर,  या गावात प्रचार दौरा झाला. या दौऱ्यात भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, रयतचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रा येताळा भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव नागणे,लक्ष्मण मस्के, दामाजी कारखान्याचे व्हॉइस चेअरमन अंबादास कुलकर्णी, संचालक सचिन शिवशरण यांची उपस्थिती होती.

आज कोरोना परिस्थितीच्या नावाखाली जनतेला सरकार घरी बसवत आहे, पण यांच्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, माझे कुटुंब, माझी जबाबदारी, हे स्वतःचे कुटुंब सांभाळू शकत नाहीत ते राज्य कसे चालवणार? शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडली, उन्हाळ्यात पाण्याअभावी पिके जळू लागली, मंगळवेढ्यात शहरालगत 118 एकर जमीन एका सौरऊर्जा प्रकल्पासाठी घेतली, तिथं किती युवक कामाला लागले? युवा ,सुशिक्षित, बेरोजगारांचा प्रश्न गंभीर आहेत, त्यांना उद्योग उभारणे महत्वाचे आहे, असे किती उद्योजक 11 वर्षात उभारले? विकासाचा कोणताही मुद्दा नाही, आता पुन्हा मंगळवेढ्याला पाणी देतो अशी भाषा होऊ लागली आहे, त्या भूलथापांना बळी पडू नका, विकासाच्या मुद्दे घेऊन जनतेसमोर या, भावनेने कुणाचे पोट भरत नाही असा हल्लाबोल आवताडे यांनी केला.

रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले म्हणाले, 11 वर्षात काय दिले, बेरोजगार युवकांना काम देणारी संस्था उभी केली का? शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी बँक उभी केली का? काही नाही, उलट विठ्ठल कारखान्यावर 600 कोटीचे कर्ज केले, प्रत्येक निवडणुकीला कर्ज काढायचे व निवडून यायचे आणि आपले घर भागवायचे, ज्या औदुंबर अण्णांनी भालके यांना जवळ केले, राजकारण शिकवले वेळ आल्यावर त्या अण्णांच्या पाठीत खंजीर खुपसला. दामाजीवर 130 कोटीचे कर्ज केले, आज तेच कर्ज फेडण्याचे काम समाधान आवताडे करत आहेत, किती हा लबाडपणा आता तरी सावध व्हा, आवताडे यांना विजयी करा.

एस एम कन्ट्रक्शन असेल सूत मिल च्या नावाखाली हजारों युवकांच्या हाताला काम दिले, भालके यांनी काय दिले? मारवाडी वकील यांच्या नंतर 50 वर्षानंतर समाधान आवताडे या मंगळवेढ्याच्या भूमीपुत्राला आमदार करण्याची वेळ आली आहे, यात जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत, मी नाही तर माझ्या विचारांचा माणूस व्हावी अशी त्यांची प्रामाणिक अपेक्षा आहे. त्यामुळे ही संधी परत कधीच येणार नाही असे प्रा. येताळा भगत यांनी सांगितले.

 या दरम्यान ते मारापूर गावात आले असता त्या सभेवेळी दिवंगत आमदार भारत भालके यांचे कट्टर समर्थक शंकर तात्या आसबे यांनी ग्रामपंचायत सदस्य अशोक आसबे यांच्या बरोबर आपल्या समर्थकांसह हातावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ काढून गळ्यात भाजपचा शेला घेतला.

प्रवेशानंतर शंकर आसबे म्हणाले, मी वातावरण पाहून निर्णय घेणारा माणूस आहे, तुम्ही श्रीराम, मारुती व ग्रामदैवत खंडोबाच्या या देवतांच्या आशिर्वादाने आमदार होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. मारापूर मधून 2 हजारापैकी दीड हजाराहून अधिक मतदान तुम्हाला मिळेल, आमदार झाल्यावर मारापूर आंधळगाव रस्ता करावा अशी मागणी केली.मंगळवेढा तालुक्यातील देगाव, शरद नगर, घरनिकी, , मारापूर,  या गावात प्रचार दौरा झाला. या दौऱ्यात भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, रयतचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रा येताळा भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव नागणे,लक्ष्मण मस्के,गौरीशंकर बुरकूल, संचालक राजेंद्र सुरवसे, खंडू खंदारे, गणेश गावकरे, बिरुदेव कोळेकर, अंबादास वायदंडे, त्या त्या गावचे सरपंच चेअरमन प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *